उसलेल माझा समुद्र असा की
एक नाव तू धरून ठेव,
आठवनींच्या अभालात
एक गांव कोरुन ठेव.
जमेल न जमेल पुन्हा शिडे उभारण,
म्हणून काळजाचा हात सहज हातात धरून ठेव.
किनाऱ्याचं काय तो तुटणारच असाही ,
पण, तुटलेल्या लाटेचंही एक घर करून ठेव.
जखमांना सतावतिल वेदनांचे हिंसाचार
गुदमरलेल्या वादलांना मी गेल्याचा अर्थ विचार.
मी येईलही पुन्हा उसलत्या लाटांसोबत...
तोपर्यंत..., पापण्यांतली आसवे
काळजावर स्मरुण ठेव...!
उसलेल माझा समुद्र असा की
एक नाव तू धरून ठेव.....!
- कृष्णा बेलगावकर
- कृष्णा बेलगावकर


